अमळनेर (प्रतिनिधी)तलाठी हल्लाप्रकरणी आरोपीला अटक केल्याने तलाठी संघटनेने सुरु केलले लेखणी बंद आंदोलन मागे घेतले आहे. याबाबतचे निवेदन तलाठी संघटनेने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कावपिम्प्री येथे १६ जून रोजी अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई साठी गेलेल्या तलाठी प्रथमेश पिंगळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्याने तलाठी संघटनेने सुरु केलले लेखणी बंद आंदोलन मागे घेतले आहे याबाबत चे निवेदन तलाठी संघटनेने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गणेश महाजन, कार्याध्यक्ष स्वप्नील कुलकर्णी यासह इतर तलाठी बांधव उपस्थित होते.